*तापी नदीला महापुर आल्याने तापी नदी काठावरील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी साठी (उ बा ठा) गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे सह शिवसैनिक व शेतकरी यानी पहाणी केली असता शेतकऱ्यांच्या पिकांची पुर्णपणे नासधुत झाली असता शासनाने नुकसान भरपाई द्यावी असे आव्हान केले आहे*प्रतिनीधी गोपाल कोळी शिंदखेडा ता. दिनांक १७/९/२०२३ रोजी तापी नदीला आलेल्या महापुराचे पाणी आज दिनांक १९/९/२०२३ वार मंगळवार रोजी पुराची पातळी कमी झाली म्हणून उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे सह शिवसैनिक व शेतकरी तापी नदी काठावरील शेतकऱ्यांचे शेतपिक पाहणी करण्यासाठी तापी काठावरील शेतात गेले त्यावेळी तापी नदी काठावरील शेतकऱ्यांचे शेतपिक पुर्णपणे तापी नदीच्या पुराच्या पाण्यात आले होते व तापी नदीच्या पुराचे पाणी हे गडूळ असते त्याच्यात पिक पुर्णपणे बुडीत झाले होते त्याच बरोबर दिड महिन्या पासुन पाऊस आला नव्हता म्हणून पिक वाढ झालेली नव्हती त्यात आता गाळ युक्त पाण्यात पिक बुडीत झाल्यामुळे तापी नदी काठावरील शेतकऱ्यांचे शेतपिके पुर्णपणे नासधुत झाली आहे त्यावेळी शेतकऱ्यांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व माजी जि प सदस्य छोटू पाटील यांच्या जवळ व्यथा मांडली की महागाचे बियाणे व रासायनिक खते खरीदी करुन पेरणी केली होती व आता तर शेतातील पिकांची पुर्णपणे नासधुत झाली म्हणून खर्च देखील येणार नाही व दुजर पेरणी करण्याची वेळ देखील गेली आहे त्यातुन मुलांचे शिक्षण करायचे की उदरनिर्वाह करायच तर तो पण कसा यावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितले की शासनाने तापी नदी काठावरील शेतकऱ्यांना भरीव अनुदान लवकरात लवकर ध्यावे असे आवाहन केले आहे त्यावेळी उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, माजी जि प सदस्य छोटू पाटील ,शिंदखेडा येथील राजु भाऊ माळी, शेतकरी दिनेश वाकडे, सुरेश कुभार, आकाश थोरात, राहुल वाकडे, प्रविण कोळी रुपेश वाकडे, अविनाश पाटील, योगेश चौधरी सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते
तापी नदीला महापुर आल्याने तापी नदी काठावरील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी साठी (उ बा ठा) गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे सह शिवसैनिक व शेतकरी यानी पहाणी केली असता शेतकऱ्यांच्या पिकांची पुर्णपणे नासधुत झाली असता शासनाने नुकसान भरपाई द्यावी असे आव्हान केले आहे
