शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात भर…*समग्र शिक्षा अंतर्गत राज्यातील बहुतांश शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापित केल्या असून प्रत्येक शाळेवर या संगणक प्रयोगशाळेसाठी एकेक संगणक प्रशिक्षक सुद्धा रुजू करण्यात आलेले आहे, आधुनिक काळातील तांत्रिक शिक्षणाची गरज लक्षात घेऊन तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट समोर ठेवून, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, यांच्याद्वारे आयसीटी (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल 49 शाळांमध्ये हा उपक्रम चालू असून, अतिशय चांगल्या प्रकारचा हा उपक्रम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, राज्य प्रकल्प संचालक श्री. संजय यादव सर सूचनेप्रमाणे व नंदुरबार जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी श्री. भानुदास रोकडे (प्राथ.) यांच्या मार्गदर्शनाने राबविण्यात येत आहे, या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना तसेच शाळेतील इतर शिक्षकांनाही फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.
