कर्जोत (ता. शहादा) येथे निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
.शहादा शहरापासून साधारण १२ कि.मी. अंतरावर असलेल्या कर्जोत येथे सद्यस्थितीत गावात पिण्याच्या व दैनंदिन वापराच्या पाण्याची परिस्थिती अत्यंत भीषण झाली असल्याने शिवसेनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असता.यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री चंद्रकांत पवार यांनी कर्जोत येथील पाणी टंचाई बाबत तात्काळ दखल घेत शहादा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना तात्काळ कर्जोत गावात भेट देवून त्वरित पाणी टंचाई सोडविण्याची सुचना केली.नंदुरबार जिल्हा परिषदेच्या कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री चंद्रकांत पवार यांना शिवसेना तालुका प्रमुख शिवसेना मनलेश जायसवाल,कर्जोतचे सरपंच सुभाष सोनवणे,युवा सेना जिल्हा उप प्रमुख राजरत्न बिरारे व शिवसेना पदाधिकार्यांनी प्रत्यक्ष भेटून कर्जोत (ता. शहादा) येथे निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाई बाबत निवेदन दिले आहे कि,शहादा शहरापासून साधारण १२ कि.मी. अंतरावर असलेल्या कर्जोत या गावाची लोकसंख्या सुमारे २००० च्या आसपास आहे.सद्यस्थितीत गावात पिण्याच्या व दैनंदिन वापराच्या पाण्याची परिस्थिती अत्यंत भीषण झाली असून गावकऱ्यांना पाण्यासाठी प्रचंड हाल अपेष्टा सोसाव्या लागत आहेत.पाणी पुरवठ्याची सद्यस्थिती:- गावाबाहेर ५०० मीटरवर असलेल्या विहिरीतून सध्या पाणी उपसा करून गावात आणले जाते हे पाणी ब्रिटिशकालीन विहिरीत सोडून त्यानंतर जलकुंभात चढवले जाते ही प्रक्रिया जटील असल्याने सध्या गावकऱ्यांना ४ ते ५ दिवसाआड पाणी मिळत आहे.ते ही दुषित पाणी असल्याने संपुर्ण गावात रोगराई वाढलेली आहे.उन्हाळ्यातील संभाव्य संकट:- गावाजवळील विहीर मार्च महिन्यापर्यंतच तग धरते त्यानंतर पाणीटंचाई इतकी तीव्र होते की, २-३ कि.मी. अंतरावरील खासगी बोरवेल (उदा. प्रवीण शेलार यांच्या शेतातील)अधिग्रहित करून गावाची तहान भागवावी लागते.मार्चनंतर गावकऱ्यांना १० ते १२ दिवसांनी पाणी मिळत आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.हातपंपांची दुरवस्था:- गावात एकूण ८ हातपंप असून त्यांपैकी ६ हातपंप नादुरुस्त आहेत. सुरू असलेल्या २ हातपंपांची भूगर्भातील पाणीपातळी खोल गेल्याने त्यातून हंडाभर पाणी काढण्यासाठी महिलांना शारीरिक कष्ट व प्रचंड वेळ खर्च करावा लागत आहे.जल जीवन मिशनचा सावळागोंधळ:- ३-४ वर्षांपूर्वी गावात ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत काम सुरू झाले.मात्र, संबंधित ठेकेदाराने पाणी उपलब्धतेचे कोणतेही ठोस नियोजन न करता काम सुरू केले.आजमितीस केवळ २५ ते ३० टक्के काम झाले असून, ठेकेदाराने काम अर्धवट सोडून पळ काढलाआहे. रस्त्यांचे नुकसान:- पाणीपुरवठ्याची पाईपलाईन टाकण्यासाठी ठेकेदाराने गावातील काँक्रिटीकरणाचेपक्के रस्ते खोदून ठेवले आहेत, ज्यामुळे ग्रामस्थांना येण्या-जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावालागत आहे. प्रमुख मागण्या व अपेक्षित उपाययोजना:-१) तात्काळ टँकर पुरवठा: पाण्याची भीषणता पाहता गावात तातडीने किमान २ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा.२) हातपंप दुरुस्ती: गावातील ६ नादुरुस्त हातपंप युद्धपातळीवर दुरुस्त करून देण्यात यावेत.३) जल जीवन मिशनची चौकशी व पूर्तता: अर्धवट राहिलेले जल जीवन मिशनचे काम तातडीने दुसऱ्यासक्षम यंत्रणेमार्फत पूर्ण करण्यात यावे व संबंधित हलगर्जी करणाऱ्या ठेकेदार व संबधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी.४) दीर्घकालीन उपाययोजना (नाला खोलीकरण): गावातील भूगर्भातील पाणीपातळी वाढवण्यासाठीगावालगतच्या नाल्याचे खोलीकरण करून तिथे छोटे-मोठे बंधारे/धरणे बांधून पाणी अडवण्यात यावे.कर्जोत येथील ग्रामस्थांना किमान एक दिवसाआड मुबलक पाणी मिळेल अशी व्यवस्था तातडीने व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे केल्यावर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री चंद्रकांत पवार यांनी कर्जोत येथील पाणी टंचाई बाबत तात्काळ दखल घेत शहादा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना तात्काळ कर्जोत गावात प्रत्यक्ष भेट देवून त्वरित पाणी टंचाई सोडविण्याची सुचना केली. या निवेदनावर मनलेश जायसवाल यांच्यासह युवा सेनेचे उप जिल्हा प्रमुख राजरत्न बिरारे,कर्जोत येथील सरपंच सुभाष सोनवणे,ग्रा.प.सदस्य कृष्णा ठाकरे,ग्रा.प.सदस्य संतोष गिरासे,जयसिंग ठाकरे,लक्ष्मण पवार,प्रा.विजय गायकवाड,मनोज पाथरवट,अशोक वसावे,जगदीश ठाकरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
